Tuesday, August 21, 2018

नवबौद्धांनी ख्रिश्चन होण्याचे फायदे आणि चर्चचे समानतेचं सफेद झूट!


Image may contain: one or more people and text
Times of India- Caste discrimination in Kerala relief camp, district collector orders probe
नवबौद्धांनी ख्रिश्चन होण्याचे फायदे आणि चर्चचे समानतेचं सफेद झूट!



Image may contain: text
All India True Christian Council- AITCC
हिंदु दलित आणि तथाकथित मागासवर्गीयांना साफ खोटं सांगुन ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करायचं! एकदा तुम्ही ख्रिश्चन झालात की मग आपण सगळे समान होऊ, जातीय भेदाभेदांचा त्रास तुम्हाला होणार नाही असं खोटं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात त्यांच्याशी अत्यंत घाणेरडा व्यवहार करायचा ही चर्चची मुलभूत कार्यपद्धती आहे.

केरळच्या पुरात समाजाच्या सर्व थरातील लोकी भरडले गेले आहेत. मदत शिबिरे चालवताना जातीपातीचा विचार कुणाच्याही मनाला शिवलेला नाही. पण ख्रिश्चनांनी मात्र दलितांनी शिजवलेलं अन्न पूर मदत केंद्रात खायला नकार देऊन आपले खरे रंग जगाला दाखवले. केरळच्या अल्ल्लपुझ्झा जिल्ह्यातील ही घटना गेल्या महिन्यात घडलेली आहे. मदत केंद्रात राहणाऱ्या दलित बांधवांनी तक्रार केल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरु केली आहे. 
आणि यापूर्वी मे महिन्यात केरळमध्येच केविन जोसेफ नावाच्या दलित ख्रिश्चन तरुणाने सवर्ण ख्रिश्चन मुलीसोबत लग्न केले म्हणून केरळच्या उच्च वर्णीय ख्रिश्चनांनी स्थानिक कम्युनिस्ट नेत्यांच्या मदतीने केवीनची हत्या केली. चर्चने  आजपर्यंत एक शब्द काढलेला नाही. 

चर्चचे जातीपाती आणि भेदभाव विरहित समाजाच्या निर्मितीचं आश्वासन किती खोटं आहे आणि चर्च आतून बाहेरून कसा जातीयवादी आहे हे सिद्ध करणाऱ्या शेकडो घटना रोज घडत असतानाही बामसेफचे वामन मेश्राम यांच्यासारखे नेते चर्चच्या अत्यंत कुटील कारस्थानाला बळी पडत आहेत, ते कसे आता बघु

ऑल इंडीया ट्रू ख्रिश्चन कौन्सिलने १२ ऑगस्ट २०१८ ला राष्ट्रीय ख्रिश्चन मेळावा आयोजित केला होता. याला भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा प्रभारी विलास खरात यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याचा उद्देश बहुजन समाजाला जागृत करणे हा होता. पण कशाबद्दल याचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत नव्हता. यात जाऊन मेश्राम साहेबांनी काय मार्गदर्शन केले याचा उल्लेख नंतर सापडला नाही. मेथॉडीस्ट चर्चचे धर्मगुरू रेव्हरंड शमुवेल यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. 

भारतातील जातीजातींना एकमेकांविरुद्ध लढवून त्यातील दुबळ्या जातीचा आधी घास घ्यायचा आणि दुसरे ख्रिश्चन डेनॉमिनेशन दुसऱ्या जातीच्या मागे उभे करून मग त्या जातीचा घास घायचा. नंतर दोन्ही जातीत भीषण संघर्ष पेटवून दोन्ही बाजुंनी त्यात मध्यस्थी करायची आणि शांती स्थापनेचे "क्रेडीट" चर्चच्या खिशात टाकायचा हा धंदा चर्च गेली १५० वर्षे खेळत आहे. 


भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये कार्बी-डिमासा संघर्ष, नागा-कुकी दंगे, राभा-गारो रक्तपात हे आणि असे अनेक रक्तरंजित संघर्ष चर्चने घडवून आणले आहेत. त्यात दोन्ही बाजुंनी चर्चनेच मध्यस्थी केली आणि वर क्रेडीट सुद्धा लाटलं!

आता हाच प्रयोग चर्च उर्वरित भारतात करू इच्छीत आहे.  वामन मेश्राम यांच्यासारखे भोळे भाळे नेते या बदमाश चर्चच्या जाळ्यात अलगदपणे सापडले आहेत. मेश्रामांच्या कोणत्याही भाषणात त्यांच्या आत हिंदु धर्माविषयी किती विखार भरलेला आहे ते जाणवतं पण तो कुणी भरला आहे हे मात्र खालील बातमी वाचल्यावर समजलं! 

ऑल इंडीया ट्रू ख्रिश्चन कौन्सिलने आयोजित केलेल्या मेळाव्याचा उद्देश बहुजन समाजाला जागृत करणं हा बिलकुलच नाही, त्याचा उद्देश नवबौद्धांना ख्रिश्चन करणं हाच आहे. आधी शेकडो देवतांना मानणाऱ्या (Polytheist) हिंदू जाती एकदेवत्व मानणाऱ्या बौद्ध धर्मात परावर्तित झाल्या आता त्या अशाच दुसऱ्या एकदेवत्व (Monotheist) मानणाऱ्या ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित होणं ही तुलनेने सोपी प्रक्रिया आहे. 

नवबौद्धांनी ख्रिश्चन होण्याचे फायदे काय? 

एकदा का नवबौध्द बांधव ख्रिश्चन झाले की, चर्चची "कथनी" आणि "करणी " यात किती फरक आहे याचा प्रत्यक्ष अनुभव वामन मेश्राम यांच्या सारख्या सर्व भोळ्या भाळ्या नेत्यांनी येईल. 

शिवाय चर्चचा उद्देश ख्रिश्चन झालेल्या लोकांच्या आत्म्यांना मोक्ष मिळवून देणं हा नसुन सर्व नव-ख्रिश्चनांचे मिळतील ते सर्व "रिसोर्सेस" गिळंकृत करणे हा आहे हे हे कटू सत्य समस्त बहुजन नेतृत्वाला कळून चुकेल. 

मनुवाद्यांकडुन आणि हिंदुत्त्ववाद्यांकडून "संविधान" आणि बहुजन समाजाला धोका आहे अशी बोंब मारणारे ख्रिश्चन अर्थात चर्च स्वतः किती निर्लज्जपणे संविधानाला पायदळी तुडवते हेही आमच्या भोळ्या बहुजन नेतृत्वाला कळेल.  गेल्या वर्षभरात कॅथॉलिक चर्चने कमीत कमी ४ वेळा राष्ट्रवादी संघटना आणि हिंदुत्ववादी यांच्याकडून दलित, ट्रायबल्स, अल्पसंख्य आणि संविधान यांना धोका असल्याची आरोळी ठोकली आहे परंतु प्रत्यक्षात चर्चनेच गेल्या ७० वर्षात पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाची उघड उघड हेटाळणी केली आहे. संविधानाच्या पाचव्या शेड्युल अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र, छत्तीसगढ, झारखंड, बिहार, ओरिसा, आंध्र येथील आणि संविधानाच्या सहाव्या शेड्युल अंतर्गत येणाऱ्या नॉर्थ ईस्ट मधील ७ राज्यातील सुमारे २ लाख एकर जमिनी, ज्या कधीही ट्रायबल्स शिवाय अन्य कुणालाही खरेदी करता येत नाहीत, अशा गिळंकृत केल्या. 
आता सांगा संविधानाला खरा धोका कुणाकडुन आहे? चर्चकडुन का हिंदुत्ववाद्यांकडुन ?

भोळ्या बहुजन बांधवांना मनुवादी, ब्राह्मणवादी, हिंदुत्ववादी अशा विविध राक्षसांची भीती दाखवायची आणि हळूच त्यांना चर्चच्या पदराखाली ओढायचं आणि मग त्यांच्या जागा जमिनी सर्व गिळायचं अशी ही धूर्त चाल आहे.  हा यशस्वी धंदा चर्चने लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया सर्वत्र अतिशय योजनाबद्ध पद्धतीने केला आहे, आता भारतीय बहुजनांचा घास घ्याल चर्चने आपला अक्राळ विक्राळ जबडा उघडला आहे.  

पूज्य बाबासाहेबांनी चर्चचा धोका ओळखुन त्यांना आपल्यापासून चार हात दूर ठेवलं होतं पण सध्याचं नेतृत्व हे वामन मेश्राम, प्रकाश आंबेडकर यांच्यासारखं अत्यंत साधं आणि कमालीचं भोळं असल्याने त्यांना चर्चचा धोका आणि त्यातून बहुजनांची भविष्यात होणारी लुटपाट आणि जबरदस्त शोषण याचा धोका कळत नाही त्यामुळे सध्याचं नेतृत्व आपल्या अनुयायांना अलगदपणे चर्चच्या झोळीत टाकेल आणि येणाऱ्या अनेक पिढ्या याचा दोष सध्याच्या नेतृत्वाला देतील.... 

आणि हे अगदी अटळ आहे....  

त्यामुळे नवबौद्धांनी ख्रिश्चन झाल्याशिवाय चर्चचा खरा चेहरा त्यांना दिसणार नाही म्हणून त्यांनी एकदा प्रत्यक्ष ख्रिश्चन व्हावंच म्हणजे चर्चचे अंतरंग त्यांना दिसतील आणि आपले कोण आणि परके कोण याचाही अर्थ लागेल!


Times of India- Caste discrimination in Kerala relief camp, district collector orders probe
Sajimon P S | TNN | Updated: Jul 22, 2018, 23:03 IST





Add to Google