Friday, August 24, 2018

आयर्लंडची कॅथोलिक बलात्कार गृहे आणि अर्भकांची सामुहिक दफनभूमी!

आयर्लंडची कॅथोलिक बलात्कार गृहे आणि अर्भकांची सामुहिक दफनभूमी!

-विनय जोशी 

पोपच्या दौऱ्याने कॅथोलिक चर्चच्या लैंगिक पापी इतिहासाला परत एकदा वाचा फुटली!

आयर्लंडच्या कॅथोलिक चर्चने महिला आणि मानवतेवर ज्या प्रकारे अत्याचार केले त्याला जगात तोड नाही. या सगळ्याच्या मुळाशी होत्या  "मॅग्दालीन लाउंड्रीज", ज्याच्या आड बंदिस्त महिलांवर अमानुष लैंगिक अत्याचार केले गेले आणि त्यांच्यापासुन झालेली तान्ही मुले बळजबरीने आईपासुन तोडुन अज्ञात लोकांना दत्तक दिली गेली. कॅथोलिक चर्चचा हा अमानुष धंदा कित्येक वर्ष बिनबोभाट चालु होता. पोपच्या आयर्लंड दौऱ्याच्या निमित्ताने त्याला परत एकदा वाचा फुटली आहे.

पोपच्या आगामी आयर्लंड दौऱ्याची तिकिटे/पासेस घेऊन तिथे नं जाता निषेध नोंदवण्याचे आंदोलन जोर पकडत आहे. कॅथोलिक चर्चने गेल्या शेकडो वर्षात आयरिश महिला आणि मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल लोकांच्या मनात तीव्र संताप आहे. १९९६ ला शेवटची  महिला "मॅग्दालीन लाउंड्रीज" मध्ये पाठवली गेली आणि त्यानंतर एका ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम करताना २०० अर्भकांचे मृतदेह पुरले गेल्यानंतर लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड संताप उफाळुन येऊन हे प्रकार बंद झाले. तरीही निर्लज्ज कॅथोलिक चर्चने आजपर्यंत "मॅग्दालीन लाउंड्रीज" मधील एकाही पिडीत महिलेला नुकसानभरपाई दिलेली नाही! आणि याबद्दलच लोकांच्या मनात कॅथोलिक चर्च बद्दल संताप आणि राग आहे.

अठराव्या शतकात "चारित्र्यहीन" स्त्रियांना शिक्षा म्हणून यात आणुन कोंबायला सुरुवात केली गेली. "चारित्र्यहीन" महिला कोण हे चर्चचे पाद्री ठरवू लागले. जी सुंदर आणि भोगायला उत्तम ती "चारित्र्यहीन" ठरवली जाऊ लागली. एकदा तिच्यावर हा शिक्का पडला कि ती "मॅग्दालीन लाउंड्रीज" मध्ये आणुन टाकली जायची. आयर्लंडची न्यायालये सुद्धा लहान सहान गुन्ह्यासाठी महिलांना असल्या भयानक तुरुंगात पाठवु लागली.

विशेष म्हणजे धार्मिक गुप्ततेच्या नावाखाली आजपर्यंत एकूण किती महिला यात कोंबून ठेवल्या गेल्या, कितींवर बलात्कार झाले, किती अर्भके मेली आणि किती आपल्या आयांपासून वेगळी करून समाजात दत्तक दिली गेली याची कुठेही नोंद नाही! यातील महिलांना शिस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवसभर मौनात राहावे लागत होते! आपण कल्पनाच करू शकत नाही, की जी महिला बाह्य जगापासुन वेगळी केलेली आहे तिच्या वाट्याला काय काय आलं असेल आणि स्वतःचं तान्हं बाळ कुणी हिसकावून नेल्यावर बंदिस्त बाईच्या मनाचं काय झालं असेल!

पोपच्या या दौऱ्याच्या दिवशीच तुआम या ठिकाणी एका शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी एक कॅथोलिक माता आणि बालगृह होते आणि तिथेच ८०० अर्भकांचे पुरलेले मृतदेह मिळाले होते. अत्यंत किळस आणणारा प्रकार आहे हा सगळा!

"मॅग्दालीन लाउंड्रीज" मधील महिलांना मोठ्या आंदोलनानंतर आयर्लंड सरकारने नुकसानभरपाई भरपाई दिली पण गेंड्याच्या कातडीचं आणि पैश्याच्या राशी असलेलं कॅथोलिक चर्च अजुनही या बाबतीत अजिबात कान हलवत नाही...

हे वाचुन यापुढे हिंदी सिनेमातल्या पांढरा डगळा घातलेल्या दयाळु-कनवाळु-मायाळु फादर किंवा सिस्टरच्या प्रतिमेवर ठेवाल विश्वास?

कॅथोलिक चर्च हे पाप, अत्याचार, गुन्हेगारी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, दमन, रक्तपात याचं सामनार्थी नाम आहे....

उघडा डोळे....

आणि लोकांचे उघडायला मदत करा....


सनातन- कॉंग्रेस-राष्ट्रवादी मॅच फिक्सिंगचे पुरावे!



---- विनय जोशी

सनातन संदर्भात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना मवाळ होते आणि आता आक्रमक झाले असं "लोकसत्ता" म्हणतोय!
पवार साहेबांचं यात काय बरं गणित असेल? गृहखातं १५ वर्ष सलग राष्ट्रवादीकडेच होतं.....
सनातनवर संशय त्याच गृहखात्याचे पोलीस घेत होते......
त्यांचेच आमदार विधानसभेत सनातनवर बंदीची मागणी करत होते......
त्यांचंच राज्य सरकार त्यांच्याच केंद्र सरकारला सनातनवर बंदी घालण्याची लेखी शिफारस करत होतं.....

मग... माशी शिंकली कुठे?

सनातन नावाची "गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडुन खाल्ली" हे धोरण कुणाच्या सुपीक डोक्यातुन बाहेर आलं? सनातनला सुखाने वाढू द्यायचं आणि त्याच्या मार्फत संघाला मागे रेटता येईल तेवढं रेटायचं हे धोरण सलग १५ वर्ष राष्ट्रवादीने मस्त राबवलं.

२००४ ला कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेत आली आणि ५ जुन २००८ ला "आम्ही पाचपुते" नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये एक स्फोट झाला. या नाटकात हिंदू देवतांची बदनामी केलेली आहे म्हणुन स्फोट घडवण्यात आला अशी कबुली सनातनचे साधक रमेश गडकरी आणि विक्रम भावे यांनी पोलिसांजवळ दिली, खटला चालुन ३० ऑगस्ट २०११ ला या दोघांनाही १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.

यानंतर पुढे पुर्ण ३ वर्षे महाराष्ट्रात आणि देशात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात होतं. बॉम्बस्फोटाच्या खटल्यात ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली त्या संघटनेवर बंदीसाठी सबळ पुरावे नाहीत असं कॉंग्रेसचे केंद्रीय गृहमंत्री का म्हणत होते आणि महाराष्ट्राचं गृहखातं गप्प का बसुन होतं?

कारण संघ संबंधित संस्थांना मागे रेटण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीला एक मजबूत मोहरा हवा होता.

महाराष्ट्राच्या लहान लहान गावात प्रचंड मोठे हिंदु मेळावे आणि त्यात आक्रमक धार्मिक भाषणे, शस्त्र प्रशिक्षणे आणि युवकांना खेचण्याचे भावनिक कार्यक्रम सतत चालु होते. केंद्रीय गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी ऑडीओ रेकॉर्डिंग डिव्हायसेस घेऊन अशा कार्यक्रमांना नियमित उपस्थित राहत होते. त्यातुन सरकारने काहीच बोध घेतला नव्हता का?

आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी सनातनच्या नावाने कितीही बोंबलो खुद्द सनातनला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना याची चांगली जाणीव आहे की सनातन कशासाठी वाढू दिली गेली आणि आता तिच्यावर बंदीची मागणी कशाबद्दल केली जात आहे....

मांजर डोळे मिटून दुध पितं आणि आपल्याला कोणीही बघत नाहीये असं समजत राहतं... तीच अवस्था सनातन- कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची आहे....
तेव्हा कुणालाच मुर्ख बनवायला जाऊ नका....

कळलं???? का अजुन मोठ्याने बोलु???

Image may contain: 6 people, including Nayan Chowdhury Nayan, text

No automatic alt text available.



Add to Google