Wednesday, August 29, 2018

सनातनवर कॉंग्रेसला बंदी का नको होती? शिवसेना-वसंतसेना भाग-२ चा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग!


Image may contain: one or more people and glasses

सनातनवर कॉंग्रेसला बंदी का नको होती?
शिवसेना-वसंतसेना भाग-२ चा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग!

---- विनय जोशी
सनातनवरील बंदीला तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांचाच विरोध होता! १ डिसेंबर २०१५ ला लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे तावातावाने मोदी सरकारला जाब विचारात होत्या की तुम्ही सनातनवर बंदी का घालत नाही? त्यावर मंत्री किरेन रिजीजु यांनी त्यांना उत्तर दिलं की सनातनवर बंदी घालण्याएवढे पुरावे सरकारकडे नाहीत आणि बंदी कोर्टात टिकणार नाही, असं तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम याचं मत होतं!
मुख्य प्रश्न आहे, की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सनातनवर बंदीच्या विरोधात का होते?
महाराष्ट्रात सनातनने अतिशय वेगाने आपला पसारा वाढवला. संघ आणि संबंधित हिंदु संघटना ज्या समाजघटकात ५० वर्षात पोचु शकल्या नाहीत त्यात सनातन फक्त ५ वर्षात पोचली. खेड्यापाड्यात आक्रमक हिंदुत्व मांडणारे हिंदु मेळावे सुरु झाले. संघाची हिंदुत्वावरील मक्तेदारी मोडणारी एक शक्ति उदयाला येतेली बघुन महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारने सनातनाकडे काणाडोळा केला. त्याची परतफेड म्हणुन सनातन त्यांच्या वृत्तपत्रात संघाला, सरसंघचालकांना तिरकस आणि जोरकस प्रश्न विचारू लागली, "हेच का तुमचे हिंदुत्व", "ह्यालाच हिंदुराष्ट्रवाद म्हणतात?" वगैरे. कॉंग्रेस सरकारमधील राष्ट्रवादीचे गृहमंत्री आबा पाटील यांनी सनातनवरील बंदीच्या मागणीकडे साफ साफ दुर्लक्ष केलं असा आरोप अनिसचे श्याम मानव यांनी केला आणि वर हेही सांगितलं की आबांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी शरद पवारांकडे गेलो आणि त्यांनी बंदीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं!
या सरकारने बंदीचा प्रस्ताव त्यांच्याच केंद्र सरकारला पाठवला पण एकुणच ही "नूरा कुश्ती" म्हणजे खोटी कुस्ती होती त्यामुळे केंद्र सरकारने प्रस्ताव फेटाळला. ठाण्यात सुतळी बॉम्बच्या स्फोटात सनातनचे काही लोक पकडले जाऊनही बंदीचा प्रस्ताव फेटाळला गेला हे आणखी एक नवल!
सनातनचा कॉंग्रेसला उपयोग काय?
शिवसेना जेव्हा अतिशय नवीन होती तेव्हा कॉंग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी- वसंतरावांनी कम्युनिस्टांची ट्रेड युनियन मधील दादागिरी मोडुन काढण्यासाठी शिवसेनेला बळ दिलं. त्यामुळे शिवसेनेला गंमतीने "वसंतसेना" म्हणायचे! हाच प्रयोग संघाला शह देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सनातनच्या बाबतीत करत होते.
आबा पाटील पक्षशिस्त मानणारे नेते होते, शरद पवारांना फाट्यावर मारण्याची त्यांची इच्छा कधीच नव्हती, त्यामुळे श्याम मानव म्हणतात तसं आबांनी सनातन बंदीचा प्रस्ताव फेटाळला तो पवारांच्या हुकुमावरूनच आणि नंतर पवारांनी स्विकारला तो धोरण म्हणुनच. पण वास्तवात सनातनवर बंदी घालुन कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सनातनच्या प्रचंड मोठ्या साधक वर्गाला दुखावण्याची अजिबात इच्छा नव्हती.
जर सनातन आहे तशीच झपाट्याने वाढत राहिली संघाचा "हिंदुत्व" जनाधार घसरेल आणि परिणामी भाजपचा प्रसार कमी होईल अशी भोळी आशा मनात होती. पण ती फोल ठरली.
मग सनातन घातपातात सामिल आहे अशा बातम्या पुढे येऊ लागल्या तेव्हा त्याला "हिंदु आतंकवाद" नावाच्या नव्या लेबलखाली संघाशी जोडुन सगळ्यांना एकत्र बदनाम करता येईल या हिशेबाने कॉंग्रेस साठी सनातनची उपयोगिता वाढली. पण लोक संघ-सनातनला एका मापात मोजायला तयार होईनात.
मग सनातनचे संस्थापक डॉ. आठवले ब्राह्मण आहेत (अनुयायी बहुसंख्य बहुजन असले तरीही!) त्यामुळे सनातनला "ब्राह्मणी कावा", "मनुवादी" यांच्याशी जोडणं सोपं जाईल म्हणुन ती सगळ्यांच्याच सोयीची "पंचिंग बॅग" झाली.
पण यातला एकही प्रकार कॉंग्रेसच्या निर्णायक आणि निखळ फायद्याचा ठरेना, त्यामुळे आता सगळं घोंगडंं भाजप सरकारच्या गळ्यात घालून दोघेही मोकळे झाले!
संघ-भाजप यांच्या हिंदुत्वाची सगळ्यात अर्वाच्य भाषेत हेटाळणी सनातने केली आहे. संघ प्रमुख मोहनराव भागवतांवर सर्वात खालच्या पातळीवरून टीका सनातनने केली आहे. आणि तरीही राजकीय फायद्यासाठी सनातन-संघ यांना एकाच मापाने मोजण्याचे प्रकार बिनदिक्कत चालु आहेत.
काल पकडलेले लोक खरंच गुन्हेगार आहेत का? ते सनातन ते खरंच साधक आहेत का? ते खरंच धर्माच्या नावाखाली हिंसाचार करणार होते का? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत.
पण..... एक गोष्ट नक्की आहे, राजकीय फायद्यासाठी आणि नेहरू-इंदिरा गांधी- सोनिया गांधी यांनी आपट-आपट-आपटून जो संघ संपला नाही तो सनातनच्या उग्र हिंदुत्वाच्या काठीने संपवण्याचा आणि वसंतसेनेच्या माध्यमातुन अजुन एक नवीन शिवसेना स्थापुन संघाला "काऊंंटर बॅलन्सिंग फोर्स" तयार करण्याचा मोठा प्लान मात्र सपशेल तोंडावर आपटला आहे!
No automatic alt text available.

No comments:


Add to Google